Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

कोरोना के साथ भी - कोरोना के बाद भी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? भाग ४

 कोरोना के साथ भी - कोरोना के बाद भी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? भाग ४  पालकत्वावरील कोणत्याही पुस्तकात, भाषणात आणि गप्पातपालकांना हमखास दिला जाणारा सल्ला म्हणजे, "मुलांना वेळ दिला पाहिजे!" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात "आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही" याची टोचणी सतत मनाला असताना, "मुलांना वेळ दिला पाहिजे" असं कुणी म्हणालं की का कुणास ठाऊक पणअजूनच ओशाळल्यासारखे होते! त्यात अजून भर म्हणजे, सध्या कोरोनाच्या काळात घरून काम करत असून सुद्धा आपण, मुलांना वेळ देऊ शकत नाही ही भावना अजूनच जास्तच तीव्रतेने छळू लागते!  आजच्या भागात पालकांनी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं याविषयी युनिसेफ या मुलांसाठी जगभर काम करणाऱ्या संस्थेचे मत काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आपण आपली "प्रोफेशनल" कामे करत असताना ज्याप्रमाणे प्रत्येक कामासाठी "ठरवून" वेळ काढतो, अगदी तसेच आपण आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी "ठरवून" किमान २० मिनिटे तरी रोज वेळ काढलाच पाहिजे. आपण दिवसभरात कमीत कमी १६ तास म्हणजे ९६० मिनिटे जागे असतो, त्यापैकी केवळ २...

कोरोनाशी लढताना - भाग ३ मुलांना भावनिक आधार देण्याच्या तीन सोप्या पद्धती

  युनिसेफच्या म्हणण्यानुसार मुलं जेव्हा तणावपूर्ण परिस्थितीतून जात असतात, तेव्हा तीन प्रकारे आपण मुलांना मदत करू शकतो. १. ऐकून घेणे मुलांना ज्या ज्या वेळी आपल्याला काही सांगायचे असेल, आपल्याशी बोलायचे असेल, तर त्या वेळी इतर सगळी कामं बाजूला ठेवून सगळ्यात आधी मुलांचे म्हणणे ऐकले पाहिजे. जर मुले स्वतःहून आपल्याशी बोलत नसतील, तर मुलं आपल्याशी संवाद करतील अशा संधी जसे की एकत्र जेवण करणे, गोष्ट सांगणे, एखादी एक्टिव्हिटी एकत्र करणे, अशा गोष्टी केल्या पाहिजेत. पूर्वी तुमचा मुलांशी जेवढा संवाद होत्या त्याच्या किमान दहा पट जास्त वेळ तुम्हाला या काळात मुलांसाठी द्यायचा आहे. २. आरामदायी, सौहार्दपूर्ण वातावरण मुलांना घरात वावरताना, शांत, समाधानी व आश्वस्त वाटेल, असे वातावरण घरात निर्माण केले पाहिजे. त्यासाठी वर सांगितलेल्या गोष्टी जसं की गोष्ट सांगणे, एकत्र खेळणे हे तर केले पाहिजेच पण त्याचबरोबर मुलांनी केलेल्या  चांगल्या गोष्टींचे भरपूर कौतुक केले पाहिजे. जसे की घरकामाला मदत असेल, एखाद्या गोष्टीत धाडसीपणा दाखवला असेल, नियोजन कौशल्य दाखवलं असेल, तर त्याचे  भरभरून कौतुक झाले पाहिजे. अ...

मुलांना भावनिक आधाराची गरज आहे, हे कसे ओळखावे?

  कोरोनाशी लढताना - भाग २ मुलांना भावनिक आधाराची गरज आहे, हे कसे ओळखावे? मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे याचा अर्थ उठसुठ मुलांना मदत करत सुटायचे का?  तर बिलकुल नाही. अनेक मुले स्वतःला अशा कठीण काळात सहज सावरतात, त्यामुळे उगीचच हसणाऱ्या मुलाला आधी रडवून मग मदतीसाठी जाण्याची गरज नाही! मुलांना आपल्या भावनिक आधाराची गरज आहे हे ओळखण्याची काही लक्षणं युनिसेफने सांगितली आहेत. ती म्हणजे, १. झोप व जेवण या दोन्ही गोष्टींमधील अनियमितता २. रात्री दचकून उठणे ३. आक्रमकता किंवा कशातच रस न घेणे ४. दिनक्रमात किंवा आहारात विशेष बदल नसतानाही, डोकेदुखी व पोटदुखी विषयी सातत्याने तक्रार करणे ५. एकांताची भीती ६. छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरवेळी एकट्याने केल्या जात होत्या त्यासाठी मदत मागणे ७. एखादी नवीन भीती तयार होणे, जसे की टेरेसमध्ये जायला घाबरणे ८. खेळण्याचा कंटाळा करणे, खेळण्यात उत्साह नसणे ९. सतत दुःखी असणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येणे यापैकी कोणतीही लक्षणे सातत्याने दिसत असतील तर मुलांना भावनिक आधाराची गरज आहे, असे समजून मगच पुढील भूमिका ठरवावी. ...

कोरोनाशी लढताना - भाग १ मुलांच्या भावनिक गरजा समजून घेताना

सतत घरात असल्याने, ठराविक माणसांशीच संवाद होत असल्याने व रोजच्या जगण्यात तोचतोचपणा आल्याने मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. त्यातच सोशल मीडिया असो, टीव्ही असो किंवा घरातील चर्चा असो, एकूण सगळीकडेच सातत्याने नकारात्मक गोष्टी ऐकल्याने, बघितल्यानंतर मुले चिडचिड करू लागतात, हायपर ऍक्टिव्ह होतात. अशा वेळी मुलांच्या भावनांना लेबल न लावता, त्या जशाच्या तशा स्वीकारणे, त्यांचा आदर करणे हे आपले पाहिले काम आहे. मुलांच्या मनात अशा भावना साठून राहू नयेत, त्या मोकळेपणाने व सकारात्मक पद्धतीने व्यक्त करता याव्यात या साठी मुलांना चित्र काढायला देणे, मातीकाम, लाकुडकाम करायला देणे, त्यांच्याशी वेगवेगळे खेळ खेळणे, काही नवीन खेळ शोधून काढणे(!) हे आपण करू शकतो. घरामध्ये शारिरीक व शाब्दिक हिंसा होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. संकटात फक्त आपण सापडलेलो नाही, तर संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. संकटात सापडण्याची आपली काय किंवा जगाची काय ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे आपण स्वतः आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्या वागण्याने मुलांना घरात असुरक्षित वाटणार नाही याची आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी...