Skip to main content

Posts

Showing posts from 2025

बदलत्या काळात शिक्षण कसे समजून घ्यावे?

  अनेकदा शिक्षण याविषयावर चर्चेला सुरुवात झाली की ती पूर्वी शाळा या विषयावर येऊन थांबायची. मागच्या काही वर्षात, विशेषतः कोविडनंतर, शिक्षण या विषयावर चर्चा करताना आता "शाळा की होमस्कूलिंग" अशी नव्या पद्धतीने चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दोन ध्रुव तयार होऊन दोन्ही ध्रुव आपापली पोझिशन बळकट करण्यासाठी आपापले मुद्दे मांडू लागले. यामध्ये "शिकण्याची भाषा" हा एक नव्याने ध्रुव तयार होत आहे, असे देखील वाटू लागले आहे. कोणत्याही चर्चेत माझा एक कटाक्ष असतो — ज्या व्यवस्थेचा आपल्याला अनुभव नाही, त्यावर शक्यतो आपले मत व्यक्त करू नये; किंवा केल्यास त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ द्यावा. माझा गेल्या काही वर्षात शाळा या व्यवस्थेशी संबंध राहिलेला नाही, मात्र शिक्षणाशी आहे. त्यामुळे मी "शिक्षण" हा संदर्भ घेऊन माझे मत मांडायचा प्रयत्न करेन. १. मुलांच्या शिक्षणाविषयी विचार करताना सगळ्यात आधी आपल्या मुलांविषयी आपल्याला सहवेदना असणे गरजेचे आहे. २. या सहवेदनेने आपल्याला मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडथळे समजून घेणे आणि त्यांना नक्की कुठे मदत हवी आहे, ह...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...