Skip to main content

स्व अध्ययन -  आनंदी व समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली. 


माणसाला किंवा खरं तर कोणत्याही सजीवाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? याचा शोध घेतला तर निर्विवादपणे एकच उत्तर येईल, ते म्हणजे "स्वातंत्र्य". 

प्रत्येक सजीव जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करून आनंदाने, समाधानाने तेव्हाच जगू शकतो, जेव्हा तो त्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतो. माणसाच्या सातत्याने चालणाऱ्या संघर्षाचे मूळ जर आपण बघितले, तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचात सापडते.  

माणूस त्याच्याही नकळत कधी गरजा वाढवून ठेवल्याने, खऱ्या गरजा ओळखता न आल्याने आर्थिक, सामाजिक पारतंत्र्यात अडकत जातो. नोकरीतून स्वातंत्र्य हवे असते पण कर्जाचे हप्ते बेडीचे काम करतात,  शहरातील दगदगीने मन आणि शरीर थकून जाते, त्याला निसर्गातील मोकळ्या वातावरणाची ओढ लागते पण पुन्हा एकदा, नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणाच्या बेड्या आड येऊन, माणसाचे स्वातंत्र्य हिरावले जाते. 

माणसाच्या आयुष्यात घडणारे असे सगळे संघर्ष स्वातंत्र्य नसल्यानेच निर्माण होतात, हे नक्की. 

माणसाला शाश्वत समाधान व सुख मिळवून देऊ शकेल अशा स्वातंत्र्याचा पाया हा शिक्षणात आहे, असे मला वाटते. हे शिक्षण म्हणजे केवळ क्रमिक पुस्तकातून मिळणारे शिक्षण नाही तर माणसाला आयुष्यभर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लागणारे शिक्षण आहे. अनेकदा हे माहिती असून देखील आपल्या हातून शिकण्याचा कंटाळा केला जातो, दुर्लक्ष केले जाते याचे कारण हे आपण काय शिकायचे? याचा निर्णय आपल्या हातात नसणे, हेच असते. 

माणसाला निसर्गतः स्वातंत्र्य प्रिय असते. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, प्रत्येक माणसाकडे एक "रडार" असते. हे रडार म्हणजे "अँटी पर्स्युयेशन रडार"! इतरांनी आपल्याला कोणतीही गोष्ट करायला सांगितली रे सांगितली की ही गोष्ट सांगणारा आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणतोय असे आपल्याला वाटून, त्या माणसाचे "सांगणे" आपले हे रडार लगेच हाणून पडते!

त्यामुळे इतरांनी आपल्याला दिलेले सल्ले आपल्या फायद्याचे आहेत की तोट्याचे याचा फारसा विचार या रडार मुळे आपण करत नाही आणि आपल्याला हवे तेच करत राहतो. 

शिक्षणाच्या बाबतीत देखील हेच लागू पडते. जर विद्यार्थ्याने मग तो कोणत्याही वयाचा असो, काय शिकायचे? कसे शिकायचे? कुणाकडून शिकायचे? याचे निर्णय स्वतः घेतलेले असतील, तर असे शिक्षण हे कायम विद्यार्थ्याला समाधान मिळवून देते. समाधान मिळणारे शिक्षण घेतल्याने पुढे जाऊन काय करायचे? याचे उत्तर देखील अशा विद्यार्थ्यांना मिळते. 

कोणत्या क्षेत्रात काम करायचे? याचे स्वातंत्र्य असल्याने, उपजीविका म्हणजे तुरुंग न वाटता समाधान मिळवून देणारी गोष्ट वाटते. म्हणजेच माणसाचे स्वातंत्र्य अशा प्रकारे अबाधित राहू शकते. 

थोडक्यात काय तर जन्मापासून स्वतंत्र आयुष्य जगणे ही माणसाची नैसर्गिक इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करायची असेल  तर माणसाला हवे ते शिकण्याची संधी मिळणे व त्यातून हव्या त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे ही त्याची मूलभूत गरज आहे

ही मूलभूत गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकांना मदत करू शकलो, तर एक आनंदी व निकोप आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र समाजाची आपल्याला निर्मिती करता येईल. 
चेतन एरंडे. 


Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...