Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

होमस्कुलिंग व परीक्षा - भाग - ३

इतर विषय विशेष करून भाषा, परिसर विज्ञान शिकताना त्याला पुस्तकातील धडे वाचणे, व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कंटाळवाणे वाटत होते. हे असे का होत असावे, याचा विचार करताना सहजच आमचे लक्ष तो वापरत असलेल्या NCERT च्या पुस्तकात शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांकडे गेले. त्या सूचना वाचताना व या क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्तींशी चर्चा करताना, आम्हाला एक गोष्ट समजली, ती म्हणजे, अभ्यासक्रमाची पुस्तके ही खरी म्हणजे मुलांसाठी नसून, कोणत्या क्षमता विकसित होण्यासाठी काय तयारी करून घेतली पाहिजे, याची शिक्षकांसाठी असलेली माहिती पुस्तिका आहे. पुस्तकात जे लिहिले आहे, ते "साक्ष" म्हणून न वापरता, त्या माहितेचे "साक्षांकन" करण्यासाठी , ती माहिती तपासून घेण्यासाठी, मुलांना भरपूर मोकळा वेळ व वातावरण निर्माण करून देणे, हे शिक्षकाचे खरे काम आहे. हे समजल्यामुळे आम्ही तो वापरत असलेल्या पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या संकल्पना सिद्ध करण्याची स्नेहला भरपूर संधी उपलब्ध करून देऊ लागलो, त्यामुळे त्याच्या क्षमता तर विकसित झाल्याच शिवाय, ज्ञान व माहिती याच्यातला फरक त्याला आपो...

होमस्कुलिंग व परीक्षा - भाग - २

वयानुसार मुल पुढच्या इयत्तेत जात असताना त्याच्या केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक व मानसिक क्षमता देखील विकसित झाल्या आहेत किंवा नाही याचे तीन तासात " फ्लॅश मूल्यमापन" न करता जर त्या मुलाचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन झाले, तर आणि तरच   आपण त्या मुलाला व शिकण्याच्या एकूण प्रक्रियेला न्याय देऊ शकतो. २००५ साली सादर झालेल्या राष्ट्रीय शिक्षण आराखड्यामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ डॉक्टर यशपाल व त्यांच्या टीमने सुद्धा हाच विचार मांडला. शाळांमधून परीक्षार्थी नव्हे तर विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून सर्व शिक्षण हक्क कायद्याने पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा ही प्रचलित मूल्यमापनाची पद्धत बंद करून सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा आग्रह धरत, पास व नापास अशी विभागणी न करता मुलांना तणावरहित शिक्षणाची संधी दिली. मात्र असे "शास्त्रीय व नैसर्गिक मूल्यमापन" ग्लॅमरस नसल्यामुळे म्हणा किंवा पालक व शिक्षक या दोघांनाही "सतत कामाला लावणारे" असल्यामुळे म्हणा, किंवा माझा मुलगा तुमच्या मुलापेक्षा हुशार आहे हा टेंभा मिरवायचे शस्त्रच   हातातून गेल्यामुळे म्...

होमस्कुलिंग व परीक्षा - भाग - १

नम्र विनंती: ही पोस्ट वाचण्याआधी, प्रत्येकाने आधी स्वत:ला दोन प्रश्न विचारून, त्याची उत्तरे तयार ठेवावी. पहिला प्रश्न "मुलांची परीक्षा नक्की कशासाठी घेतली जाते?" दुसरा प्रश्न "मुलांच्या परीक्षेचा निकाल बघून शिक्षक, पालक व मुले यांनी कोणती कृती करणे अपेक्षित आहे?" होमस्कुलिंग म्हणजे ते मुक्त वातावरणात, मुलांच्या गतीनुसार, कलानुसार शिक्षण वगैरे घेणे सगळे ठीक आहे, पण या मुलांच्या परीक्षेचे आणि सर्टिफिकेटचे काय? जर सर्टिफिकेटच नसेल तर सगळे येत असूनही   यांना नोकरी कोण देणार आणि ही मुले स्वत:च्या पायावर उभी तरी कशी राहणार? आई बापाच्या होमस्कुलिंगच्या हट्टापायी पोराला कायमचे घरी बसायला लागू नये म्हणजे मिळवली.. होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांच्याविषयी अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच, कधी तो उघडपणे विचारला जातो, तर कधी पाठीमागे तावातावाने फक्त चर्चा केली जाते. जेंव्हा आम्ही स्नेहचे होमस्कुलिंग करायचा विचार केला, तेंव्हा "परीक्षा व सर्टिफिकेट" या विषयावर आम्हीही अशीच तावातावाने चर्चा केली. मात्र आम्ही तिथेच न थांबता किंवा सगळे जग परीक्षा देतंय म्हणून आप...

होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग २

होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग २ या पृथ्वीवर आपण जसे राहतो , तसे अनेक प्राणी , पक्षी , वनस्पती सुद्धा राहतात व त्यांना आपल्याइतकाच जगाय चा   अधिकार आहे , हे विसरून शाश्वत जीवनशैलीऐवजी , गरज नसतानाही सतत संपत्ती गोळा करण्यासाठी पळणारी व " स्पर्धेच्या युगात " पुढे राहण्यासाठी गरज पडल्यास इतरांच्या पायात पाय घालणारी माणसे , आपण उठ सुठ रोज ज्यांना शिव्या घालतो ते राजकारणी , ते नोकरशहा , ते बेशिस्त वाहनचालक " सोशलाईज " आहेत , त्यांना समाजभान आहे , असे तुम्हाला वाटते का ? " सगळे भारतीय माझे बांधव आहेत " हे शाळेत शिकूनही , जेंव्हा मोठी झाल्यावर हीच मुले जातीपातीवरून आपल्याच "भारतीय बांधवांशी"   भांडत बसतात , आपापल्या जातीचे झेंडे घेऊन मोर्चे काढतात , हे बघितल्यावरही शाळेत गेल्याने सोशलायजेशन होते , यावर विश्वास ठेवावा का ?    याचे कारण म्हणजे बसमधून शाळेत एकत्र येणे आणि जाणे म्हणजे केवळ सोशलायजेशन नाही तर , मी बसमध्ये बसलेलो असताना जो उभा आहे...