Skip to main content

"मुक्त शिक्षण" बोर्ड




महाराष्ट्र सरकारने मुक्त शिक्षणासाठी २०१८-१९ पासून नवीन बोर्ड सुरु करायचा निर्णय घेतल्यानंतर होमस्कुलिंग करत असलेल्या तसेच होमस्कुलिंग करणाऱ्या पण त्याविषयी उत्सुकता असलेल्या अनेक पालकांच्या मनातील कुतूहल जागे झाले, काहींच्या उत्साहाला उधाण आले तर काही जणांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात आता प्रचंड क्रांती वगैरे घडेल असे समजून मनातल्या मनात उत्सव साजरा केला.

त्याचबरोबर काही पालकांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी हा निर्णय कसा चुकीचा ठरू शकतो हे सांगून त्यातील धोके स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुळात असे कोणतेही बोर्ड महाराष्ट्रात प्रत्यक्षात सुरु झालेले नसून ते जून २०१८ मध्ये सुरु होईल असे सरकार म्हणते. आम्ही लोकपाल आणू संसदेत महिलांना आरक्षण देऊ असे सुद्धा सरकार म्हणत असल्याचे आपल्याला स्मरत असेलच. त्यामुळे जे अन्न अजून ताटात वाढलेलेच नाही, ते तिखट आहे, गोड आहे की आंबट आहे, याविषयी आत्ताच फारशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही.

असे बोर्ड सुरु करणे म्हणजे मुक्त शिक्षणात क्रांती तर सोडा साधा "बदल" आहे असे ,म्हणणे सुद्धा धाडसाचे आहे. कारण अशा प्रकारची बोर्ड यापूर्वीच भारतातील १७ राज्यांनी सुरु केली आहेत, ज्यामध्ये पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशी राज्ये आहेत. आंध्र प्रदेश मध्ये  तर असे बोर्ड १९९१ सुरु झाले आहे!  नवस हि संस्था तर राष्ट्रीय पातळीवर १९७९ पासून काम करत आहे. तरीही "मुक्त शिक्षण" आपल्याकडे रुजलेले नाही हे सत्य आहे.

अशा प्रकारची बोर्ड म्हणजे केवळ परीक्षा घेण्याची एक व्यवस्था असते. त्यांची मुक्त शिक्षणाची व्याख्या म्हणजे, प्रौढ शिक्षण, लवकर नोकरी करायला सुरुवात केल्यामुळे,  दहावी बारावीची परीक्षा दिलेली नसल्यामुळे ज्यांना बढती मिळत नाही, त्यांना या परीक्षा देण्याची सोया करून देणे. हे करत असताना जमले तर आर्थिक परिस्थीती नसल्याने शाळेत जाऊ शकणाऱ्या, रस्त्यावर राहून जगण्याची आर्थिक लढाई करणाऱ्या मुलांना "परीक्षेची" त्यांच्या सवडीप्रमाणे संधी उपलब्ध करून देणे हा आहे. आजकाल थोड्या फार प्रमाणात म्हणजे ताटात चवीपुरती चटणी वाढावी त्या प्रमाणात, "जीवन कौशल्ये" या नावाखाली व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

एकीकडे "मुक्त शिक्षण" बोर्ड म्हणायचे आणि दुसरीकडे परत मुक्त शिक्षणाला परीक्षा, अभ्यासक्रम, सर्टिफिकेट या चक्रात अडकवायचे हे "मुक्त शिक्षण" हि संकल्पनाच समजल्याने लक्षण आहे. आज शिक्षण मुक्त नाही कारण ते सगळ्या मुलांसाठी एकाच अभ्यासक्रम केवळ एकाच प्रकारचे मूल्यमापन यांच्या कचाट्यात अडकले आहे.

मुक्त शिक्षण बोर्डाने परीक्षे पलीकडे जाऊन "शिकणाऱ्याचे" मूल्यमापन कसे करावे आणि हे मूल्यमापन उच्च शिक्षण रोजगाराची संधी देताना कसे ग्राह्य धरावे याचा खरे म्हणजे विचार करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर जीवनाशी सुसंगत, शिकणाऱ्यांच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम तयार करून, शिकणे ही"माझ्या आईवडिलांच्या म्हातारपणाची सोया" नाही तरी "मला समाधानाने आनंदाने जगता यावे" ही  माझी गरज आहे, अशी भावना "शिकणाऱ्यांच्या" त्यांना "शिकवणाऱ्यांच्या"  मनात कशी निर्माण कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे.

ज्या देशात बुलेट ट्रेन, हायपरलूप, लोकांना वाहतुकीची शिस्त लावणे, भ्रष्टाचार थांबवणे, या  सारख्या "अवघड" गोष्टींचा विचार करून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आटापिटा केला जातो, त्या देशात शिक्षणक्षेत्रात एकाच प्रकारची परीक्षा एकाच प्रकारचा अभ्यासक्रम याच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकण्याची संधी देणारी "मुक्त शिक्षण" बोर्ड किंवा व्यवस्था निर्माण करणे ती प्रत्यक्षात  आणणे अजिबात अवघड काम नाही, फक्त गरज आहे ती  इच्छाशक्तीची मुक्त शिक्षणातून  तयार झालेल्या  स्वतंत्र विचारांच्या मुक्त अभिव्यक्तीच्या नागरिकांना सामोरे जाऊन त्यांच्यावर "शासन" करण्याच्या भीतीतून "मुक्त" होण्याची...

बाकी सरकार म्हणते तसे खरेच असे बोर्ड सुरु झाले तर जे आपल्या मुलांचे होम स्कुलिंग करत आहेत त्यांना मातृभाषेतून परीक्षा देण्याचा जगाला दाखवण्यासाठी जवळ एक सर्टिफिकेट ठेवण्याचा "अजून एक" मार्ग उपलब्ध होईल इतकेच, बाकी आपल्या मुलांचा "शिकण्याचा प्रवास" मुक्तपणे हवा यासाठी लागणाऱ्या "प्रशस्त वाटा" शोधण्याचे काम आपले आपल्यालाच करायचे आहे, त्यासाठी हे "मुक्त शिक्षण बोर्ड" मदतीला येणार नाही, एवढे मात्र पक्के लक्षात ठेवावे.



Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...