Skip to main content

कोरोनाशी लढताना - भाग १ मुलांच्या भावनिक गरजा समजून घेताना







सतत घरात असल्याने, ठराविक माणसांशीच संवाद होत असल्याने व रोजच्या जगण्यात तोचतोचपणा आल्याने मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.

त्यातच सोशल मीडिया असो, टीव्ही असो किंवा घरातील चर्चा असो, एकूण सगळीकडेच सातत्याने नकारात्मक गोष्टी ऐकल्याने, बघितल्यानंतर मुले चिडचिड करू लागतात, हायपर ऍक्टिव्ह होतात.

अशा वेळी मुलांच्या भावनांना लेबल न लावता, त्या जशाच्या तशा स्वीकारणे, त्यांचा आदर करणे हे आपले पाहिले काम आहे.

मुलांच्या मनात अशा भावना साठून राहू नयेत, त्या मोकळेपणाने व सकारात्मक पद्धतीने व्यक्त करता याव्यात या साठी मुलांना चित्र काढायला देणे, मातीकाम, लाकुडकाम करायला देणे, त्यांच्याशी वेगवेगळे खेळ खेळणे, काही नवीन खेळ शोधून काढणे(!) हे आपण करू शकतो.


घरामध्ये शारिरीक व शाब्दिक हिंसा होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. संकटात फक्त आपण सापडलेलो नाही, तर संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. संकटात सापडण्याची आपली काय किंवा जगाची काय ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे आपण स्वतः आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्या वागण्याने मुलांना घरात असुरक्षित वाटणार नाही याची आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी काळजी घेतली पाहिजे.

कोरोनाविषयी सतत बोलण्याने व त्याविषयी बातम्या बघितल्याने आपण त्याच्याविरोधातील लढाई जिंकणार नाही, त्यामुळे हा विषय शक्यतो टाळावा.

त्याचबरोबर कोरोना झाला म्हणजे त्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने काहीतरी मोठा गुन्हा केला आहे आणि आपण त्यांना वाळीत टाकले पाहिजे, असा मेसेज, सिग्नल मुलांना जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कारण यामुळे जर उद्या आपल्यावर ही वेळ आली तर आपल्याला पण लोकं गुन्हेगार समजून वाळीत टाकतील, अशी भीती वाटून मुले अस्वस्थ होऊ शकतात.

हा एक केवळ साथीचा आजार आहे. आपण योग्य काळजी घेतली,  नियमित व्यायाम केला, योग्य आहार घेतला तर आपल्याला हा आजार होण्याची शक्यता कमी असते. जरी चुकून आपल्याला हा आजार झाला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्यावर मात करू शकतो. भारतात ७६ टक्क्यांपेक्षा जास्त लोकं या आजारातून बरी झाली आहेत, हे मुलांना मुद्दामून सांगितलं तर वातावरण सकारात्मक राहायला मदत होते.





अनेकदा माणसं औषधांना "योग्य व मायेच्या शब्दांची" जोड मिळाली तर लवकर बरी होतात, तंदुरुस्त राहतात. सुदैवाने असे शब्द फुकट मिळत असल्याने या काळात आपण त्याचा भरपूर वापर करून, मुलांना व आपल्याला स्वतःलाही भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी करू शकतो..
©चेतन एरंडे
क्रमशः

This post is based on the literature published by Unicef.

Comments

  1. छान लिहिला आहे. सकारात्मक मानसिकता गरजेची आहे.

    ReplyDelete
  2. भावनिक साक्षरता ही काळाची गरज आहे हे या कोरोनाने दाखवून दिले आहे...लेख छान च

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...