Skip to main content

दहावीनंतर करिअर कसे निवडावे? एक अनोखा पण सहज शक्य उपाय!



या पुस्तकाविषयी अजून जाणून घेण्यासाठी हा युट्युब व्हिडियो नक्की बघा.


अकरावी हा सगळ्याच मुलांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. पुढे जाऊन नक्की काय करायचं याचा निर्णय या वर्षी प्रत्येक मुलाला आणि त्याच्या पालकांना घ्यावाच लागतो. काही जण याची तयारी अगदी आठवी नववीपासूनच सुरु करतात. हा निर्णय शक्यतो ऍप्टिट्यूड टेस्ट, वेगवेगळे क्लासेस, पालकांशी होणारी चर्चा व त्या त्या काळात बूम असणारी करिअर्स यांचा विचार करून घेतला जातो.



हे सगळं करून निर्णय घेतल्यानंतर, भरपूर यश मिळवल्यानंतर, चांगल्या पगाराची नोकरी मिळवल्यानंतर तीन चार वर्षे काम केल्यावर अनेकजणांना मग त्यांना "नक्की काय आवडत आणि काय केलं पाहिजे?" याचा शोध लागतो! जे नशीबवान असतात, चांगले आर्थिक पाठबळ असते ते बिनधास्त एका फिल्ड मधून दुसऱ्या फिल्डमध्ये स्विच होतात. मात्र बहुसंख्य मंडळी होमलोनच्या भीतीने विकेंडची वाट बघत दिवस ढकलत राहतात आणि कामातून सुख व समाधान मिळत नाही म्हणून समाधान मिळवण्यासाठी "विविध पर्याय" शोधात राहतात,

या सगळ्यात आयुष्यातील महत्वाची वर्षे निराशेत जाण्याचा धोका असतो. मला स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तर हे जाणवत की मला नक्की कशाची आवड आहे हे जॉब करताना मी जेव्हा प्रत्यक्ष काम केले किंवा इतरांना काम करताना बघितले, तेव्हाच मला समजले!  जर मला दहावीनंतर हे सगळं बघायला अनुभवायला मिळालं असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील महत्वाची उमेदीची वर्ष वाया गेली नसती. त्यासाठी मी दहावीनंतरच एक वर्ष हे अनुभव घेण्यात घालवल असत, तरी मला परवडलं असत!

मी आणि आपल्यापैकी अनेकजण हे करू शकले नसले तरी एका मुलाने मात्र हे करून दाखवले आहे, त्याच नाव आहे राहुल.  गोव्यात राहणाऱ्या या मुलाने दहावी झाल्यावर चक्क एक वर्ष ब्रेक घेतला आणि पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे? हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा व प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याचा त्याने निर्णय घेतला.

या वर्षभरात त्याला जे अनुभव आले, त्या अनुभवांवर आधारित त्याने "शाळेपासून मुक्ती - एक वर्षापुरती" हे अतिशय रंजक पुस्तक लिहिले आहे.  नुकतीच दहावी झालेली, जेमतेम सोळा वर्षाचा हा मुलगा. या मुलाला एकट्याला अशी भटकंती करायची परवानगी देणं त्याच्या पालकांसाठी नक्कीच कठीण होतं.  


मग त्याने सुरुवातीला घराजवळील मत्सालय, अळंबी तयार करण्याची कार्यशाळा नंतर सेंद्रिय शेती समजून घेण्यासाठी वडिलांबरोबर गोव्याची सहल असा आत्मविश्वास गोळा करून राहुलने सापांची माहिती व सहवास अनुभवण्यासाठी गोव्यातून एकट्याने थेट पुण्याचे सर्पोद्यान गाठले.

त्यानंतर राहुलने चेन्नईचे गांडूळ संशोधन केंद्र, ममलापुरमचे मगर प्रजनन केंद्र अशा अनेक ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी दोन तीन आठवडे राहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला, त्यानंतर बेंगळुरूमध्ये वनक्षेत्राशी संबंधित अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या,. एवढ्या दिवसात कमावलेल्या अनुभवांच्या जीवावर एका जंगलाचे सर्वेक्षण देखील केले!




या पुस्तकामध्ये प्रत्येक अनुभव अतिशय सविस्तरपणे मांडला आहे. हे एक वर्ष राहुलला  आयुष्यभरासाठी उपयोगी पडले हे वेगळे सांगायला नकोच. आज राहुल एक यशस्वी वाईल्ड लाईफ गाईड, फोटोग्राफर व लेखक आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एका वर्षापुरती शाळेपासून मुक्ती घेतल्याने त्याला आयुष्यभरासाठी निराशेपासून मुक्ती मिळाली आहे!

आपल्याला कदाचित असं वर्षभर मुक्ती घेणं जमणार नाही. मात्र आपण जर मुले आठवी नववीत गेल्यानंतर त्यांना असे प्रत्यक्ष अनुभव द्यायला व त्या त्या क्षेत्रातील लोकांना भेटायची संधी दिली तर मला वाटत की या मुलांना करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पुढची दिशा ठरवताना कसलीच अडचण येणार नाही.  

ज्यांची मुलं पुढील करिअर निवडण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत अशा पालकांनी व मुलांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
पुस्तकांचे नाव: शाळेपासून मुक्ती - एका वर्षापुरती
लेखक - राहुल अल्वारिस
प्रकाशन - मनोविकास
सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध 

या पुस्तकाविषयी अधिक माहिती पुढील युट्युब व्हिडियोमध्ये देखील उपलब्ध आहे.  



तसेच पुढील लिंकवर देखील उपलब्ध आहे. मात्र हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/rahulalvares.pdf  

चेतन एरंडे. 
  

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...