Skip to main content

इमोशनल इंटेलिजन्स विषयी १० महत्वाच्या गोष्टी - माधवी गोखले यांच्या सेशनमधून मला समजलेल्या महत्वाच्या गोष्टी


सर्जनशील पालक समूहाने २३ मे २०२० रोजी भावनिक बुद्धिमत्ता याविषयातील तज्ञ माधवी गोखले यांच्याशी पालकांचा ऑनलाईन संवाद आयोजित केला होता.



या अतिशय माहितीपूर्ण संवादातून मला समजलेल्या गोष्टी, या ब्लॉग पोस्टमध्ये मांडायचा मी प्रयत्न करत आहे.

१. आपला रोल मॉडेल आपल्याला का आवडतो? तर तो त्याच्या नेतृत्वगुणांमुळे, झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे, टाईम मॅनेजमेंट मुळे. हे सगळे गुण "आय क्यू" शी नाही तर "इ क्यू" शी म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. म्हणजेच यशस्वी होण्यामागे, आपल्या आजूबाजूच्या जगावर प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्व निर्माण होण्यामागे भावनिक बुद्धिमत्तेचा निर्विवाद वाटा आहे.

२. भावनिक बुद्धिमत्ता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर  योग्य मार्गदर्शन घेतले तर वाढवता येऊ शकते.

३. भावना "दाबून" टाकण्याची, "नियंत्रित" करण्याची खटपट करणे चुकीचे आहे, त्यामुळे भावना अनावर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून भावनांचे नियोजन करता आले पाहिजे.



४. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये एमपथी (Empathy) म्हणजेच अनुकंपा अतिशय महत्वाची असते. त्यामुळे भावनिक बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी हे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. एमपथी किंवा अनुकंपा हे कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या चपला आपल्या पायात घालाव्या लागतात!

अनुकंपा शिकण्यासाठी दुसऱ्याच्या चपला आपल्या पायात घालायच्या असतील तर आधी स्वतःच्या चपला पायातून काढाव्या लागतात, हे समजले की अनुकंपा शिकणे सोपे जाईल!

५. कोणतीही व्यक्ती जेव्हा भावना व्यक्त करत असते तेव्हा तिच्या मनात जे समोर दिसते त्यापेक्षा बरेच काही त्या व्यक्तीच्या मनात चालू असते यालाच आईसबर्ग मॉडेल किंवा हिमनगाचे टोक असे म्हणतात त्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यासाठी आपण फक्त हिमनगाचे टोक बघत आहेत, हे लक्षात ठेवावे.



६. आपली मुले जेव्हा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा आपली प्राथमिकता आपल्या मुलांशी संवाद करण्याला असली पाहिजे, त्यांना आपल्याशी मोकळेपणाने व्यक्त होता आले पाहिजे.

७. आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ टॉक  या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे भावनांचे नियोजन करणे सोपे जाते.

८. कोणतीही भावना चांगली किंवा वाईट नसते, ती भावना व्यक्त करताना तुम्ही गती व ऊर्जा यांचा योग्य वापर करणे  शिकले पाहिजे.



९. राग ही भावना सुद्धा वाईट नाही कारण आपल्या पूर्वजांनी राग आणि उद्रेक व्यक्त केला म्हणून तर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकले, तो राग दाबून टाकला गेला असता तर? फक्त तो व्यक्त कसा करायचा हे शिकता आला पाहिजे.

१०. भावनिक बुद्धिमत्ता ही "सरावातून" शिकता येते, विकसित करता येते, त्यासाठी सेल्फ टॉक व सेल्फ अवेअरनेस या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत.



या सेशनला पालकांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. सर्जनशील पालक समूहाच्या पराग हर्डीकर व पल्लवी कोटीभास्कर यांनी हे सेशन यशस्वी होण्यासाठी मनापासून मेहनत घेतली.

माधवीताई या सर्जनशील पालक समूहाच्या गेले चार वर्षे सदस्य आहेत. त्यामुळे पालकांचे प्रश्न त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहेत. हे सेशन यशस्वी व्हावे, पालकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता यावे म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे या सेशनमधून दिसून आले.

भावनिक बुद्धिमत्ता याविषयावर सर्जनशील पालक समूहाचे पालक एकत्र येऊन इथून पुढे सातत्यपूर्ण काम करणार आहेत. त्याविषयी अधिक माहिती लवकरच देण्यात येईल..

सर्जनशील पालक समूहात सहभागी होण्यासाठी community.parenting@gmail.com वर मेल पाठवावी.

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...